*शरीराला आवश्यक असणाऱ्या खनिजा विषयी सविस्तर माहीती *कॅल्शिअम कशात असतं? * शेंगदाणे, तीळ, दूध, खोबरं, मुळा, कोबी. ज्वारी, राजगिरा, खरबूज, खजूर. *कमतरतेमुळे काय होतं? * हृदयरोग, ऑस्टियोपोरोसिस, दंतरोग, केस गळणे. *कार्य काय असतं? * शरीरातील सर्वात मुख्य खनिजं असून ते हाडांची मजबुती आणि शरीराच्या निर्मितीसाठी आवश्यक असतं. *लोह कशात असतं? * खजूर, अंजीर, मनुका, सफरचंद, डाळिंब, पालक, सीताफळ, उस, बोर, मध, पपई आणि मेथी. *कमतरतेमुळे काय होतं? * शरीरात रक्ताची कमतरता भासते. अशक्तपणा, कावीळ किंवा पोटात मुरडा येतो. *कार्य काय असतं? * शरीराच्या वाढीसाठी अतिशय आवश्यक असते. *सोडिअम कशात असतं? * मीठ, पाणी, बटाटा, आलं, लसूण, कांदा, मिरची, पालक, सफरचंद, कारलं. *कमतरतेमुळे काय होतं? * रक्तदाबाशी निगडित समस्या, निद्रानाश, अंगदुखी, अपचन, मूळव्याधीसारखे आजार, मोतीबिंदू, बहिरेपणा, हात अणि पाय कडक होणे. *कार्य काय असतं? * शरीराला आवश्यक असणारी पाचक रसायनाची निर्मिती करतात, त्याचप्रमाणे शरीरात होणारा गॅस नष्ट होतो. *आयोडिन कशात असतं? * शिंघाडा, काकडी, कोबी, राजगिरा, शतावरी, मीठ आणि लसूण. *कमतरतेमुळे काय होतं? * थायरॉइडची समस्या, केस गळणे, डिप्रेशन किंवा बैचेनी येणे. *कार्य काय असतं? * शरीरात उत्पन्न होणाऱ्या विषारी पदार्थापासून मेंदूला बचावण्याचं काम करतो. *पोटॅशिअम कशात असतं? * सर्व प्रकारची धान्य, डाळ, संत्र, अननस, केळं, बटाटा, लिंबू, बदाम.) *कमतरतेमुळे काय होतं? * अ‍‍ॅसिडिटी, त्वचेवर सुरकुत्या किंवा मुरुमं येणं, त्वचा रोग, केस पिकणे. *कार्य काय असतं? * शरीरात तंतू आणि यकृत यांना सुरळत ठेवण्याचं कार्य करतं. *फॉस्फरस कशात असतं? * दूध, पनीर, डाळी, कांदा, टोमॅटो, गाजर, जांभळं, पेरू, काजू, बदाम, बाजरी आणि चणे. *कमतरतेमुळे काय होतं? * ऑस्टिओपोरोसिस, गतिमंद होणे, मानसिक थकवा, दंत रोग. *कार्य काय असतं? * मेंदूला ताजंतवानं ठेवण्याचं काम हे खनिजं करतं. *सिलिकॉन कशात असतं? * गहू, पालक, तांदूळ, कोबी, काकडी, मध, *कमतरतेमुळे काय होतं? * कॅन्सर, त्वचारोग, बहिरेपणा, केस गळणे. *कार्य काय असतं? * जननेंद्रियांची कार्यक्षमता वाढवून शरीरातील तंतूना मजबूत करतात. *मॅग्नेशिअम कशात असतं? * बाजरी, बीट, खजूर, सोयाबीन, दूध, लीची, कारलं. *कमतरतेमुळे काय होतं? * उदास होणे, आळस येणे, तणाव असणे, झोप न लागणे, बैचेनी, सोरायसिस, फोडं, नपुंसकता किंवा वांझपणा. *कार्य काय असतं? * पेशीचं कार्य सुधारतं. रेचक म्हणून काम करतं. *सल्फर कशात असतं? * दूध, पनीर, डाळ, टोमॅटो, बटाटा, आलं, मिरची, सफरचंद, अननस, सुरण. *कमतरतेमुळे काय होतं? * प्रतीकारशक्ती कमी होते, केस गळतात, वजन वाढतं, मधुमेहाला आमंत्रण मिळतं. *कार्य काय असतं? * इन्सुलिनचं रेचन म्हणून कार्य करतं. *क्लोरिन कशात असतं? * पाणी, बीट, कोबी, मीठ, दूध, लिंबू, आवळा, मध. *कमतरतेमुळे काय होतं? * अ‍‍ॅसिडिटी, अल्सर, कॅन्सर, आणि अ‍‍ॅलर्जी. *कार्य काय असतं? * सोडिअम आणि पोटॅशिअमला पाचक बनवण्यासाठी सहायता करतं, त्याचप्रमाणे शरीरातील आम्लक्षाराचं संतुलन राखलं जातं. *खाद्यपदार्थामधील खनिजं शरीराला मिळावीत म्हणून काय केलं पाहिजे...* *फळं किंवा भाज्या कापल्यानंतर कधीच धुवू नयेत. असं केल्याने त्यातील खनिजं पाण्यावाटे नष्ट होतात. *डाळ, तांदूळ किंवा धान्यदेखील उकडण्यापूर्वीच स्वच्छ धुऊन घ्यावेत. *काही धान्य, फळं तसंच भाज्यांच्या सालींमध्ये खनिजांचा मोठा प्रमाणावर साठा असतो. त्यामुळे अशा सालींचा आहारात समावेश करावा. *दुधात खनिजांचा भरपूर स्रेत असतो म्हणूनच दूध जास्त प्रमाणात उकळू नये. दूध जास्त प्रमाणात उकळल्याने त्यातील खनिजं नष्ट होतात. *फळं कापून खाण्याऐवजी शक्यतो आहे तशीच खावीत. उदाहरणार्थ, चिकू किंवा सफरचंद ही फळं संपूर्ण खावीत. Compiled by Vikas P Deshpande M. E. Civil, Structural Engineer. Vastu Consultant, Feng Shui Consultant 34, Botany Boulevard, Kings Langley, NSW-2147, Australia Phones: +610434681647 (Sydney)

Comments

Popular posts from this blog