*काही किरकोळ रोगावर हे सोपे घरगुती उपाय करून पहा.... *
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
*सर्दी होतेय...*
*१ चमचा मधामध्ये चिमूटभर दालचिनी पावडर मिसळून दिवसातून दोनदा चाटा.
*जर सर्दीमुळे डोके जड झाले असेल, तर सुंठाचा लेप कपाळावर लावल्याने आराम मिळतो.
*नाकातून पाणी येतेय...*
*जायफळ व वेखंड थोडे उगाळून त्याचा लेप नाकावर व कपाळावर लावा व तेच मधात मिसळून चाटल्याने सर्दीमध्ये खूप लवकर आराम पडतो.
*कफ...*
*१०-१२ तुळशीची पाने, ४-५ काळी मिरी आणि आल्याचा तुकडा पाण्यात उकळा.
*पाणी निम्मे झाल्यावर ते गाळून कोमट असताना प्या.
*हा काढा कफ खोकल्यावर रामबाण उपाय मानला जातो.
*घशात खवखव...*
*आल्याचा रस आणि मध समप्रमाणात घेऊन ते चाटल्याने घशातील खवखव त्वरित थांबते.
*१०-१२ तुळशीची पाने पाण्यात उकळून तो काढा कोमट असताना प्यावा.
*डोकेदुखी...*
*तुळशीची पाने पाण्यात उकळून त्यात थोडे मध टाकून प्यायल्याने डोके शांत होते.
*जर डोकेदुखी पित्त किंवा गॅसमुळे असेल, तर कोमट पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्यायल्याने आराम मिळतो.
*जर ताणामुळे डोके दुखत असेल तर मानेच्या मागे गरम पिशवीने शेका. जर मायग्रेन असेल तर कपाळावर बर्फाचा पॅक ठेवा.
*आल्याचा रस आणि पुदीन्याचा रस चमचा चमचाभर एकत्र करून घ्या डोकेदुखी थांबेल.
*रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी...*
अनेक रोग रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे होत असतात हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा. त्यासाठी घरात गुळवेल आणून ठेवा.
*गुळवेलाची एक दोन काडी ठेचून पाण्यात उकळून त्याचा काढा प्या. हे रक्तातील प्लेटलेट्स वाढवते आणि इम्युनिटीसाठी सर्वोत्तम औषध मानले जाते.
Comments
Post a Comment