DRINKING WATER AFTER
WAKING UP
*🫀या ९
कारणांमुळे झोपेतून
उठल्यावर सगळ्यात
आधी प्यावं
पाणी, 🧠
रोज भरपूर
पाणी पिणं
आपल्या शरीरासाठी
फार महत्वाचं
असतं. कारण
याने पचन
तंत्र, ब्लड
सर्कुलेशन, टेम्प्रेचर
रेगुलेशन आणि
शरीरातील विषारी
पदार्थ बाहेर
निघतात. रोज
सकाळी झोपेतून
उठल्यावर पाणी
पिणं ही
एक सगळ्यात
चांगली सवय
आहे. जी
सगळ्यांना असली
पाहिजे. अनेक
तासांच्या झोपेनंतर
पाणी प्यायल्याने
शरीर हायड्रेट
ठेवणे, तुमचं
मेटाबॉलिज्म वाढणे
आणि पचनक्रिया
सुधारण्यास मदत
मिळते. दिवसाची
सुरूवात पाणी
पिऊन केल्याने
दिवसभर एनर्जी
सुद्धा मिळते.
अशात आज
रोज सकाळी
झोपेतून उठल्यावर
पाणी पिण्याचे
काय फायदे
होतात हे
आम्ही तुम्हाला
सांगणार आहोत.
*१)
शरीर पुन्हा
हायड्रेट होतं:
*
अनेक तासांच्या
झोपेनंतर तुमचं
शरीर डिहायड्रेट
होतं. अशात
सकाळी झोपेतून
उठल्यावर आधी
पाणी प्यायल्याने
शरीरातील कमी
झालेलं पाणी
भरून निघतं
आणि हायड्रेशन
लेव्हलही चांगली
होते. ज्यामुळे
शरीराच्या वेगवेगळ्या
क्रिया सुरळीत
होतात.
*२)
मेटाबॉलिज्म बूस्ट
होतं: *
सकाळी पाणी
प्यायल्याने तुमचं
मेटाबॉलिज्म पुढील
काही तासांसाठी
३० टक्क्यांनी
वाढतं. याने
तुम्हाला दिवसभर
कॅलरी बर्न
करण्यास मदत
मिळते. ज्यामुळे
तुमचं वजन
कमी होतं
आणि एनर्जी
लेव्हलही वाढते.
*३)
विषारी पदार्थ
बाहेर निघतात:
*
रात्रभर तुमचं
शरीर रिकव्हरी
मोडवर असतं.
ज्यामुळे शरीरात
वेगवेगळे विषारी
पदार्थ जमा
होतात. अशात
सकाळी झोपेतून
उठल्यावर पाणी
प्यायल्याने शरीरातील
विषारी पदार्थ
लघवीद्वारे बाहेर
पडतात. ज्यामुळे
किडनी निरोगी
राहते आणि
शरीर डिटॉक्स
होतं.
*४)
पचनक्रिया सुधारते:
*
सकाळी पाणी
प्यायल्याने पचन
तंत्र स्टिमुलेट
होतं, ज्यामुळे
मलत्याग करण्यास
अडचण येत
नाही. पोट
लवकर साफ
होतं. पाण्याने
पोट जेवणासाठी
तयार होतं
आणि दिवसभर
पोषण देतं.
*५)
त्वचा हेल्दी
राहते: *
त्वचा निरोगी
ठेवण्यासाठी शरीर
हायड्रेट ठेवणं
गरजेचं असतं.
सकाळी झोपेतून
उठल्यावर पाणी
प्यायल्याने त्वचा
चांगली राहते.
तसेच त्वचेवरील
सुरकुत्या दूर
करण्यासही मदत
मिळते. इतकंच
नाही तर
शरीरातील विषारी
पदार्थ बाहेर
निघाल्याने त्वचा
चमकदार होते.
*६)
मेंदुच्या क्रियांमध्ये
सुधारणा: *
डिहायड्रेशनमुळे कॉग्नेटिव्ह
फंक्शन्स खराब
होऊ शकतं.
सकाळी रिकाम्या
पोटी पाणी
प्यायल्याने एकाग्रता, सतर्कता
आणि स्मरणशक्ती
वाढण्यास मदत
मिळते.
*७)
मूड चांगला
होतो आणि
एनर्जी वाढते*
डिहायड्रेशनमुळे थकवा
आणि मूड
स्विंगची समस्या
होऊ शकते.
सकाळी रिकाम्या
पोटी पाणी
प्यायल्याने हायड्रेशन
रिस्टोर होतं, एनर्जी
लेव्हल वाढते
आणि मूडही
चांगला होतो.
ज्यामुळे तुम्हाला
दिवसभर फ्रेश
वाटतं.
*८)
वजन कमी
होतं: *
पाण्यामुळे भूक
कंट्रोल होते.
सकाळी जेवणाआधी
पाणी प्यायल्याने
भूक कंट्रोल
करणे, फार
जास्त खाणं
रोखलं जाऊ
शकतं. याने
तुम्हाला वजन
कमी करण्यास
मदत मिळते.
*९)
हृदय निरोगी
राहतं:*
सकाळी पाणी
प्यायल्याने हृदयावरील
दबाव कमी
होतो. याने
हेल्दी ब्लड
प्रेशर लेव्हल
कायम राहण्यास
मदत मिळते.
ब्लड सर्कुलेशन
सुधारतं आणि
शरीरातील सगळ्या
अवयवांपर्यंत ऑक्सीजन
व पोषक
तत्व पोहोचतात.
ज्यामुळे हृदयाचं
आरोग्य चांगलं
राहतं.
Comments
Post a Comment